<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420</id><updated>2012-02-16T12:12:23.736+05:30</updated><title type='text'>सुचेल तसं....</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>13</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-1187657914273758124</id><published>2011-11-10T01:26:00.016+05:30</published><updated>2011-11-10T03:49:53.798+05:30</updated><title type='text'>टंकलेखन</title><content type='html'>(हा लेख मी एक टंकलेखनाचा माजी विद्यार्थी ह्या भूमिकेतून लिहित आहे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला आठवत, टंकलेखन शिकण्याची माझी सुरवात "ऐ एस डी एफ, सेमीकोलन एल के जे" ह्या आठ अक्षरांपासून झाली. पहिले काही दिवस तर माझे दोन्ही हात अजिबात उचलले जायचे नाहीत आणि मग अक्षर कागदावर नीट उमटायचीच नाहीत. हात उचलून टंकायला गेल की थोड्याच वेळात हात जाम दुखायला लागायचे. अर्थात काही दिवसातच उचलून टंकायची सवय झाली. स्वत:चा अनुभव आणि इतरांकडे पाहून मला हे लक्षात आल की सर्वाना कधी एकदा वेगात टंकलेखन करतो ह्याची घाई झालेली असती. आमच्या संस्थेत "accuracy first then speed" चे बोर्ड बऱ्याच ठिकाणी लावलेले असायचे. त्याचा खरा अर्थ परीक्षेलाच लक्षात यायचा. लेटर आणि स्टेटमेंटला विशेष अड़चण नाही यायची पण जेव्हा शेवटचा ७ मिनिटांचा स्पीडचा भाग यायचा तेव्हा खरं टंकलेखनाच कौशल्य पणाला लागायच. एक वेळ संपूर्ण उतारा ७ मिनिटांच्या आत टंकुन संपेल पण त्यामधे किती शब्द बिनचूक आहेत हे तपासायला गेल की मग "accuracy first then speed" ची प्रकर्षाने आठवण यायची. एक तर ज्या क्षणाला परिक्षक मनगटावरचं घड्याळ काढून हातात घ्यायचे तेव्हापासूनच हात कापायला लागायचे. मग उगीचच तळहात एकमेकांवर घासून त्याना स्पीड साठी तयार करणं किंवा बोटं कडाकडा मोडून त्याना सैल करणं सुरु व्हायचं. परिक्षक स्टार्ट म्हंटले की मग खरी मजा यायची. एकाच वेळी परीक्षागृहातले सगळे टाईपरायटर त्या सात मिनिटांच्या स्पर्धेत धावायला लागायचे. बोटं दुखायला लागली म्हणून एक क्षण जरी थांबलो तरी बाकीच्या टाईपरायटरचा आवाज पाहून आपण मागे पडतो की काय अशी भीती वाटायची. लेटर, स्टेटमेंटमधे जास्तीत जास्त आणि स्पीड मधे पासिंग पुरते मार्क असच सर्वसामान्य विद्यार्थ्याच ध्येय असायच.&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;तुलनेने मराठी आणि हिन्दी टंकलेखन शिकायला कमी विद्यार्थी असायचे. एकतर ते इंग्लिशपेक्षा अवघड आणि त्यात आपल्या देशी भाषा असल्याने त्याचं लोकाना आकर्षण कमी असाव. संगणक युगाची सुरवात झाल्यावर तर विद्यार्थी संगणकाचा की-बोर्ड टाईपरायटरसारखाच असल्याने इंग्लिश टंकलेखन शिकायला यायला लागले. मी इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवरसुद्धा काम केलय. एखादा शब्द जर इरेझ करायचा असेल तर फार छान आवाज करत तो इरेझ व्ह्यायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पेजरची जागा मोबाईलनी, सायकलची मोटरसायकलनी तशीच टाईपरायटरची संगणकाने घेतली. आज आयटी क्षेत्रात काम करताना मला टंकलेखन शिक्षणाचा खूप फ़ायदा होतो. इमेल लिहिताना, कोडिंग करताना इतरांपेक्षा फार लवकर लिहून होतं. मी जेव्हा वेगात काही टाईप करत असलो की लोक मी एखादा जादूचा प्रयोग करतोय अशा नजरेनी पहात राहतात. दुर्दैवानी टंकलेखन शिकून आलेले फार कमी लोकं आजूबाजूला दिसतात. त्याना जर टंकलेखन आलं तर त्यांचा कामाचा बराचसा वेळ वाचेल. टायपिंग टयूटरसारखी सॉफ्टवेअर असतात पण क्वचितच ते शिकण्यासाठी वापरलं जातं. मला खरोखर असं वाटत की कंप्यूटर इंजिनियरला एखाद्या सेमिस्टरसाठी तरी टंकलेखन हा विषय ठेवला पाहिजे. कारण भविष्यात त्याला ह्याचा नक्कीच फायदा होइल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-1187657914273758124?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/1187657914273758124/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=1187657914273758124' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/1187657914273758124'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/1187657914273758124'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='टंकलेखन'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-6072697025943386923</id><published>2011-05-15T01:36:00.001+05:30</published><updated>2011-05-15T01:38:09.263+05:30</updated><title type='text'>गुलमोहोर</title><content type='html'>मे महिन्यातील दुपार.. लांबलचक हायवे... एसी फुल स्पीडमध्ये चालू तरीही मानेवरून घामाचे २-३ थेंब ओघळतायेत.. खरं तर त्या थेंबांचा मानेवर होणारा गार स्पर्शही बरा वाटतोय.  नेमकी गाडीत पाण्याची बाटलीही नाही. सकाळीच २ अंडी आणि वर २-३ कप चहा घेतलेला. त्यामुळे शरीराच्या आतली उष्णता बाहेरच्या तापमानाशी स्पर्धा करत होती. बाहेर इतकं कडक ऊन की त्यात क्षणभरही उभं राहीलं तरी जळून खाक होऊ की काय अशी भिती वाटली.  आधीच जास्त असलेलं अंतर उन्हामुळे आणखीनच लांब वाटायला लागलं.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;इतक्यात दूरवर एक लाल ठिपका दिसला. जसजसं त्या ठिपक्याच्या जवळ जात होतो तसं लक्षात येत गेलं की तो नुसता लाल नाही तर लालभडक ठिपका आहे. बाहेर आग ओतत असलेल्या सूर्यकिरणांपेक्षा लाल. आता तो लाल ठिपका पूर्ण विस्तारला गेला आणि लक्षात आलं की हा तर गुलमोहोर. नकळत गाडीचा वेग कमी झाला.  लालभडक फुलांनी डवरलेला गुलमोहोर डोळयात मनसोक्त साठवून घेतला. थोड्या थोड्या अंतरावर असेच गुलमोहर दिसत गेले आणि तो मनमोहक लाल रंग डोळ्यांवाटे शरीरात उतरत गेला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मनात विचार आला की लाल रंग खरं तर आक्रमकतेचं प्रतीक. मनाला अशांत करणारा रंग. लालभडक रक्त पाहीलं की काही जणांना चक्कर येते.  पण हाच रंग जेव्हा धगधगत्या उन्हात गुलमोहरावर पाहिला तेव्हा डोळे निवल्यासारखे वाटले.  मित्र म्हटला काय त्या चेरी ब्लॉसमचं कौतुक करायचं.. आपला गुलमोहोर किती सुंदर दिसतो त्यापुढे.  अगदी खरं.  पुढचे काही दिवस मी येता जाता रस्त्यांवर गुलमोहोर शोधत होतो आणि त्या देखण्या झाडाच्या दर्शनानी सुखावण्याचा पुन:प्रत्यय येत राहीला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहानपणी ह्याच गुलमोहराला लटकणा-या तलवारीच्या आकारासारख्या त्याच्या फळानी आम्ही लढाई करायचो. समोरच्याचा वार जर चुकवता आला नाही तर ती बारकी काठीपण जाम लागायची. कधी कधी झाडावर चढून त्याची लालचुटूक फुले खायचो. एकदा असंच चढत असताना सरकन एक सरडा शेजारून निघून गेला.  खोडाच्या काळपट रंगात त्याचा रंग मिसळून गेल्याने तो दिसलाच नाही.  अजूनही ते आठवलं की अंगावर काटा येतो.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑफिसला जायला घराबाहेर पडलो आणि वळणावरच गुलमोहोर दिसला. अरेच्चा!!! कधी लक्षचं नाही गेलं की ह्याच्याकडे. पुन्हा दुसऱ्या वळणावर एक गुलमोहोर. दहा किलोमीटरच्या अंतरात किमान दहा दिसले. काही पूर्ण लाल फुलांनी बहरलेले तर काही अर्धे लाल आणि अर्धे हिरवट. ऑफिसला किंवा कामासाठी शहरातल्या रस्त्यातून जाताना गडबडीत ह्या सुंदर गुलमोहराकडे लक्षचं जात नसावं.  त्या दिवशी हायवे वरून जाताना दुसरं काहीच पाहण्यासारखं नसल्यामुळे कदाचित गुलमोहरानी लक्ष वेधलं असावं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;गुलमोहराबाबत अतिपरिचयात अवज्ञI तर होत नसेल ना?  पुष्पगुच्छात फुलवाले गुलमोहराची फुले का बरं मिसळत नसावीत? किंवा आपणसुद्धा घरातल्या फुलदाणीत कृत्रिम फुलांऐवजी मुबलक उपलबद्ध असणारी गुलमोहराची फुले का बरं वापरत नाही?  १४ फेब्रुवारीला लोक गुलाबाच्या फुलाला दहा-वीस रुपये देण्यापेक्षा छानपैकी गुलमोहराच्या फुलांचा गुच्छ का नाही देत? हा पर्याय अगदीच काही वाईट नाही.  नीट पाहिलं नाही कधी पण कदाचित ती फुलं झाडावर लांबूनच छान दिसत असावीत.  नाहीतर हा सरळ सोपा उपाय लोकांनी नक्कीच सोडला नसता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;घराला, हॉटेलला गुलमोहोर नाव पाहिलंय. भारी वाटतं एकदम.  पण कोणा मुलाचं नाव गुलमोहोर नाही ऐकलं.  गुलाब, जाई, जुई, शेवंती (शेवंता) आहे पण गुलमोहोर नाही.  कदाचित ते फारचं मोठ वाटेल.  त्याचा अपभ्रंश तर अगदीच भुक्कड होईल.  गुलमोहरावर कविता पण ऐकल्याचं आठवत नाही.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;“शहरसे जा रहा था दोपहर इतनेमे दिखा खुबसुरत गुलमोहर&lt;br /&gt;हटा नही पाया उससे नजर मनमे दौड गयी खुशी की लेहर”&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा टाईपची कविता गुलजार वगैरेना सुचली नसेल का कधी?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-6072697025943386923?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/6072697025943386923/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=6072697025943386923' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/6072697025943386923'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/6072697025943386923'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='गुलमोहोर'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-7777058609848945644</id><published>2010-05-21T06:43:00.005+05:30</published><updated>2010-05-21T06:46:43.834+05:30</updated><title type='text'>काही छंद</title><content type='html'>बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो.  मला  वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ),  पोहोणं, इत्यादि.  आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही.  ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता.  त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो.  शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना.  आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार. आम्हाला आमचा खजिना हमखास बस स्टँडच्या भव्य कचराकुंडीत सापडायचा.  म्युन्सिपाल्टीचे लोक पहात नसतील एवढ्या बारकाईने आम्ही एक एक कचर्‍याचा थर काडीने किंवा तत्सम अवजाराने बाजूला करायचो. एखादा नवीन टिक्का मिळाला की हिरा मिळाल्याएवढा आनंद व्ह्यायचा.  नेमकं एक दिवस एका ओळखीच्यांनी आम्हाला संशोधन करताना पकडलं.  इमान-इतबारे त्यांनी घरी वार्ता पोहोचवली.  घरचे तसे उदार मनाचे असल्याने काही बोलले नाहीत फक्त गमतीनी विचारलं की रिकाम्या काडेपेट्याच गोळा करता ना रे बाबांनो?  माझे काही मित्र सिगरेटच्या पा़किटाच्या आतला चंदेरी कागद जमा करायचे. मला ते अगदीच भुक्कड वाटायचं. सगळ्याच सिगरेटच्या पा़कीटातील चंदेरी कागद सारखाच असणार. आणि मुळात (रिकाम्या) काडेपेट्या गोळा करतानाच एवढी अपराधीपणाची भावना होती की सिगरेटच्या पाकीटाला हात लावायची पण हिंमत नाही झाली (तेव्हा :-) ).  मग डेली कलेक्शन घेऊन घरी आलं की काडेपेट्यांचं मुखपृष्ठ धुऊन, व्यवस्थित पुसून, कापून ते एका खास वहीत चिकटवून टाकायचो.  भावाचं नशीब नेहमीचं जोरात असायचं. त्याच्याकडे रोज माझ्यापेक्षा निदान ३-४ तरी नवीन टिक्के निघायचे. मग मी मनातून थोडा खट्टू व्ह्यायचो.  झोपताना उद्या त्याच्यापेक्षा नक्की जास्त टिक्के मिळवीन असं स्वप्नं रंगवायचो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अशा तर्‍हेने बरीच वर्षं संशोधनात घातल्यावर कालपरत्वे ती वही हरवून गेली.  आज वाटतं की ती वही जपून ठेवायला हवी होती. असो, हा छंद अगदी परवडेबल होता त्यामुळे बरीच वर्षं टिकला. काही लोक देशोदेशीची नाणी गोळा करत. तेव्हा आमच्या दूरदूरच्या नात्यातसुद्धा कोणी परदेशी नव्हतं, त्यामुळे हा छंद काही जवळपास फिरकला नाही. खरा छंद माणसाला पार वेडं लावतो, बेचैन करून टाकतो.  असाच एक दुसरा छंद म्हणजे वर्तमानपत्रात, क्रिडा साप्ताहिकात आलेले क्रिकेटर्सचे फोटो जमा करणं (आणि अर्थातच एका खास वहीत ते चिकटवणं) पण लवकरच त्यातला रस संपला.  सकाळमधे चिंटू किंवा लोकसत्तात काहीतरी शौर्यगाथा का यशोगाथा असं काहीतरी यायचं पण तिकडे काही वळायची कधी इच्छा झाली नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मधेच काही दिवस प्रसिद्ध लोकांच्या स्वाक्षर्‍या गोळा करायचं खूळ डोक्यात आलं.  मला आठवतंय त्याप्रमाणे पहिली सही अरूण दातेंची घेतली.  एकूण सह्यांचा आकडा काही दहाच्या वर गेला नाही. कारण एक तर मी अहमदनगरमधे रहात असल्याने साहित्यिक,कलावंत, खेळाडू मंडळी काही विशेष फिरकायची नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम संपल्यावर किंवा मध्यंतरात ह्या लोकांच्या  मेकअप-रूम मधे जाऊन सही घ्यायला जाम संकोच वाटायचा.  एकदा आमच्या नगर वाचनालयात व.पु. आले असं कळल्यावर धावतपळत गेलो. मी कधी वपुंचा फोटो पाहिला नव्हता पण दारातच मु़ख्य ग्रंथपालांसोबत एक पाहुणा दिसला. ग्रंथपालांनी विचारलं - काय रे कोण पाहिजे? मी म्हटंलं की इथे वपु आले होते असं ऐकलं. त्यांची सही घ्यायची होती.  ग्रंथपाल म्हणाले की ते मगाशीच गेले पुण्याला.  तेवढ्यात ते पाहुणे म्हणाले की माझी सही चालेल का? मी तेवढा प्रसिद्ध नाहीये पण करतो सही तुझ्या वहीत. सही पाहिल्यावर लक्षात आलं की हे तर रमेश मंत्री. अर्थात, तेव्हा मला ह्या नावाचे कोणी लेखक आहेत हेदेखील माहित नव्हतं.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात हे सगळं इंटरनेटची क्रांती होण्यापूर्वीचं.  आजच्या काळात जर कोणी काडेपेट्याचे टिक्के शोधताना दिसलं तर मला भयानक आश्चर्य वाटेल. पण त्या छोट्या दोस्तासोबत कदाचित टिक्के शोधत परत बालपणाची सफरही करेन.  इंटरनेट आल्यावर तर वेड छंद लागले.  सगळ्यात आधी चॅटिंगचा. "ए एस एल प्लीज" हे तर चॅटिंगचं ब्रीदवाक्य होतं.  प्रत्येक सायबर कॅफेमधे MIRC नावाचं सॉफ्टवेअर असायचं. त्यावर चॅटिंगचा अक्षरशः धुमाकूळ चालायचा. नंतर याहू, हॉटमेल मेसेंजर लोकप्रिय झाले. माझे काही मित्र तर रोज १०-११ तास चॅटिंग करायचे. एक दिवस तर एकानी कहर केला. सलग वीस तास चॅटिंग केलं पठ्ठ्यानी. सगळ्यांनी फक्त त्याचा सत्कार करायचंच बाकी राहिलं होतं. तेव्हा इंटरनेट बरंच महाग होतं. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य जनतेला हे लाड परवडायचे नाहीत. मित्रांनी, मी कधी नावही ऐकलं नव्हतं अशा, देशाच्या मुलींसोबत प्रेमाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या :-).  मला काही चॅटिंगमधे (सुरूवातीचा थोडा काळ सोडला तर) फारसा इंटरेस्ट वाटला नाही.  (इथे कोणाला कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशी म्हण आठवत असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो :-) )&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर मग आयएमडीबीवर जाऊन इंग्लिश चित्रपटाची माहिती वाचत बसणं, विकीपिडीयावर जाऊन जे नाव आठवेल त्याची माहिती वाचणं, टोरंटची क्रांती झाल्यावर धपाधप पिक्चर डाऊनलोड करणं असे जे छंद लागले ते आजपर्यंत कायम आहेत.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-7777058609848945644?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/7777058609848945644/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=7777058609848945644' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/7777058609848945644'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/7777058609848945644'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2010/05/blog-post_21.html' title='काही छंद'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-6527513882236183287</id><published>2010-05-09T02:43:00.003+05:30</published><updated>2010-05-09T03:03:28.152+05:30</updated><title type='text'>ऑफिसमधे वेळ कसा घालवावा?</title><content type='html'>१. मॅच चालू असेल तर क्रिकइन्फोवर जाऊन सारखं स्कोअरकार्ड रिफ्रेश करत रहाणं (ते आपोआप काही वेळानी रिफ्रेश होत असेल तरीही) . दोन्ही संघातल्या प्रत्येक खेळाडूचं उगीचच प्रोफाईल पहात बसणं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;२. थोड्या थोड्या वेळानी ईसकाळवर जाऊन एखाद्या लेखावर आपण दिलेली कमेंट प्रसिद्ध झाली की नाही ते पहाणं. (खवचट कमेंट असेल तर ईसकाळवाले लवकर प्रसिद्धपण करत नाहीत)&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. रोज सगळे बँक अकाऊंट्स, लोन अकाऊंट चेक करत बसणं.. फारच बोअर होत असेल तर १०० रुपये सेविंग अकाऊंट मधून करंट मधे आणि परत करंटमधून सेविंगमधे ट्रान्सफर करणं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;४. वीकीपीडियात जाऊन ज्याचं नाव डोक्यात येईल त्याची माहिती सर्च करून वाचत बसणं.. त्या लेखात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर टिचकी मारुन उगीचच त्याची माहिती वाचत बसणं...&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. आयएमडीबीवर जाऊन जे डोक्यात येईल त्या चित्रपटाची माहिती वाचत बसणं.. मग त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची खाजगी माहिती, आत्तापर्यंतचे चित्रपट ह्यांची माहिती वाचत बसणं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;६. मटावर जाऊन जेवढं काही वाचणं हापिसात शक्य आहे तेवढं वाचणं आणि उरलेलं घरी जाऊन पहाणं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;७. मायक्रोसॉफ्ट वर्डमधे जाऊन एखाद्या इंग्लिश शब्दाचे समानार्थी शब्द बघत बसणं (शिफ्ट + एफ७ दाबून).. एखाद्या समानार्थी शब्दावर टिचकी मारून त्याच्या समानार्थी शब्दांच्या यादीत मूळ शब्द येतोय का नाही ते पहाणं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;८. आणि महत्त्वाचं म्हणजे - उरलेल्या वेळात हापिसचं काम करणं..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-6527513882236183287?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/6527513882236183287/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=6527513882236183287' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/6527513882236183287'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/6527513882236183287'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='ऑफिसमधे वेळ कसा घालवावा?'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-3285294647752765060</id><published>2010-04-05T04:51:00.009+05:30</published><updated>2010-04-05T05:23:53.468+05:30</updated><title type='text'>मुक्तपीठ आणि कमेंट्स</title><content type='html'>माझ्या दृष्टीने सध्या तरी सर्वात विनोदी लेखन म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधले लेख आणि (त्याहीपेक्षा) त्यावर पडलेल्या भन्नाट कमेंट्स. पब्लिक बिचारी उत्साहाने लेख लिहिते आणि तलवारी पाजळत असलेले कमेंट बहाद्दर त्यांच्या लेखाची पार खांडोळी करतात. :-) काही उदाहरणे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;* एक बाई मुलीच्या बाळंतपणासाठी चीनला जाऊन आल्या आणि मुलीला त्या बाळाला हौन्गकौंगचा आयडी मिळावा अशी इच्छा होती त्यामुळे ती हौन्गकौंगच्या एका दवाखान्यात भरती झाली. त्यामुळे त्या बाळाला चीनचा व्हिसा मिळायला ज्या अडचणी आल्या त्याचं वर्णन बाईनी लेखात केलं होत. त्यावर पडलेल्या ह्या कमेंट्स:&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;१) मुलीचं जाहीर माप काढलेले दिसतंय&lt;br /&gt;&lt;br /&gt;२) कोणी सांगितले होते नसते उद्योग करायला? ज्यांना प्रोब्लेम्स नसतात त्यांना असे प्रोब्लेम्स ओढवून घ्यायची सवय असते. इतके पैसे तिथे उधळलेत त्या पैशात १०० गरीब महिनाभर जेवले असते&lt;br /&gt;&lt;br /&gt;३) मुलगी हट्टी आहे हे सांगण्यासाठी लेखन प्रपंच केलेला दिसतोय , तरी या आजीनी एका दगडात बरेच पक्षी मारले आहेत.&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;४) आजीबाई तुमचे जावई बापू डोक्याने जरा कमी दिसतात. स्वताच्या नवजात बाळाला, ओल्या बालांतीन बायकोला आणि पूजनीय सासुमा ला अशा संकटात ढकलण्याच्या आधी नीट सगळी चौकशी करायला नको होती? यांच्या लहरीवर चालायला चीनची वकीलात म्हणजे काय पिताश्रींची जायदाद वाटली का त्यांना? बालिशच आहेत जरा.&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;५) मराठी मुली मग त्या भारतात असो नाही तर बाहेर (बाहेर जास्तच ) नवर्याला आपल्या तालावर नाचवणारच (ते सुधा स्वभाव माहित असल्यामुळे नाचतात) आणि असले प्रसंग उभे करणार मग ह्या हट्टीपणाला मनाशी ठाम वगैरे शाब्दिक आवरणं चढवून सांगितली तरी फरक पडत नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;६) या लेखातून आजीबाईना आपण व आपले जावई किती श्रीमंत आहे हे दाखवायचे होते&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;७) कालपर्यंत USA जावई पुराण सुरु होते , आजपासून नवी मालिका सुरु होत आहे - CHINA जावई पुराण.&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;८) अ) मुलगी मूर्ख दिसते आहे. ब) जावई स्वताच्या डोक्याचा वापर करताना दिसत नाही तो केला असता तर त्याला अगोदरच कळले असते कि डीलीवरीची ची तारीख आणि नवीन वर्ष एकाचवेळी आहेत आणि गोंधळ होऊ शकतो. क) बाई तुम्ही पण दिव्य आहात जाण्यायेण्याला वेळ लागतो हे माहित असूनही गप्प राहिलात ड) परत असले काही तरी लिहून आमचा वेळ वाया घालवू नका।&lt;br /&gt;&lt;br /&gt;९) अरेरे!!! काय हा दैव दुर्विलास! आजी आता जावयांना दुसरा chance घ्याला सांगा आणि या वेळी नीट सगळे प्लान करा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* एका बाईनी आपल्या मैत्रिणीच गुणगान करणारा लेख लिहिल्यावर त्यावर आलेल्या ह्या कमेंट्स:&lt;br /&gt;&lt;br /&gt;१) कहर केला ताई तुम्ही! तुमचा आणि मैत्रीणीचा एक फोटो पाठवून द्या. देवघरात लावतो उद्यापासून&lt;br /&gt;&lt;br /&gt;२) मुक्तपीठला आशयघन लेख मिळत नाहीत काय? "साभार परत" योजना करायला हवी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३) त्या दोन्ही मैत्रिणींच्या एकमेकांबद्दलच्या भावना , मते,अनुभव काहीच न देता फक्त कोण काय शिकले आहे आणि काय काम करते आहे ह्याचेच वर्णन जास्त आहे. मैत्री बद्दल लिहायचे तर त्यात त्यांची मुले, पुतणे, सुना किती कार्यक्षम आहे ह्याची लिस्ट काय कामाची?&lt;br /&gt;&lt;br /&gt;४) मला वाटत, ह्यांची मैत्रीण राजकारणात येत आहे आणि त्यांची जाहिरात म्हणून हा लेखनप्रपंच. अन्य कोणताही हेतू या लेखातून दिसून येत नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;५) पूर्वीची autobiography पुस्तके अशीच लिहिलेली दिसतील. प्रवास वर्णने तर विचारू नका. शिंप्याकडे जाऊन सूट कसा शिवला याचेच ३-४ पाने. त्यावेळी वाचायला दुसरे काहीच नसे. लिहू द्या सगळ्यांना.पण किती माहिती सार्वजनिक करायची हे बघा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* एकीनी तिच्या वस्तू हरवल्यावर तिला कशी देवमाणस भेटली आणि तिला त्या वस्तू कशा परत मिळाल्या त्यावर लेख लिहिला आणि त्यावरच्या ह्या कमेंट्स:&lt;br /&gt;&lt;br /&gt;१) बाकी काही नाही फक्त हे अधोरेखित झाले की तुम्हाला वस्तू सांभाळता येत नाहीत।&lt;br /&gt;&lt;br /&gt;२) जगाचा चांगुलपणा जरी असला तरी तुमचा वेन्धळेपणा इथे नक्कीच जाणवतो&lt;br /&gt;&lt;br /&gt;३) काकू वस्तू सांभाळायला शिका!!! प्रत्येक वेळी चांगली लोक भेटतीलच असे नाही! नाहीतर पुढच्या वेळेस कश्या वस्तू परत मिळाल्या नाही या साठी लेख लिहावा लागेल.&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;४) पण तुम्ही तुमच्या गोष्टींची योग्य काळजी घेतली पाहिजे म्हणजे हा मनस्ताप वाचेल. अनुभव १ आणि अनुभव ३ तर हलगर्जीपणाच दाखवतात. So pls take care. जगातील लोक चांगले आहेत पण आपण आपल्या हलगर्जीपणामुळे त्यांचा वेळ घालवतोय.....&lt;br /&gt;&lt;br /&gt;५) जगात चांगुलपणा आहे ते ठीक आहे पण भटकंतीचीच हौस आहे तर स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्यायलापण शिका।&lt;br /&gt;&lt;br /&gt;६) मला जर तुमची वस्तू मिळाली तर परत देणारच नाही ...लेखाची वाट पाहत बसेल.&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;७) मावशी सारख्या गोष्टी हरवत जाऊ नकात ...काळजी घ्यावी ...लोकांना काही दुसरी कामे नाहीत काय तुमच्या गोष्टी शोधात बसायला आणि तुम्हाला परत करायला?&lt;br /&gt;&lt;br /&gt;८) अहो काकू 'तो' नाही 'ते' म्हणावं अस पतीला एकवचनी संबोधण बर दिसत नाही..&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;९) लोकांची प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊ नका, कृपा करून...&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;१०) पुणेरी पाटी - "शनिवार पेठ रहिवासी XXX कुटुंबाला सूचना - इकडे कोणतीही वस्तू विसरू नये, परत केल्याचे पैसे पडतील"&lt;br /&gt;&lt;br /&gt;११) अहो जरा काळजी घ्या नाहीतर कधीतरी तुम्हीच हरवाल आणि मग नवरा प्रार्थना करेल (सभ्य गृहस्थ असावेत) की बायकोला कोणी शोधून परत पाठवू नये... ही ही ही ही ही!!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२) तुमच्या स्वताच्या चुकीने हरवलेल्या वस्तू जर परत मिळाल्या म्हणजे जगात चांगुलपणा आहे हे म्हणणे मला पटत नाही, स्वत: काशी करायची आणि मग जगाला नावे ठेवायची (चांगली किंवा वाईट) हे बरोबर नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-3285294647752765060?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/3285294647752765060/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=3285294647752765060' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/3285294647752765060'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/3285294647752765060'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='मुक्तपीठ आणि कमेंट्स'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-4721154163422755745</id><published>2010-03-23T06:47:00.002+05:30</published><updated>2010-03-23T06:49:45.218+05:30</updated><title type='text'>झोप आणि डुलकी</title><content type='html'>झोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय.  कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३.  एवढ्या कमी वेळात तर  माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली  आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या,  बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून,  जाड पांघरूण घेऊन  १०-११ तास घेता ती खरी झोप. डुलकीला त्याची सर नाही. मला तर बस/लोकल मध्ये बसल्या मिनटाला झोप यायला लागते. त्यात जर खिडकीपासली जागा असली तर सोन्याहून पिवळ.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;पूर्वी तर मला बस मध्ये अशी जोरदार झोप यायची की खिडकीच्या दांड्यावर डोकं आपटून निदान  २-३ वेळा  तरी कपाळमोक्ष व्हायचा. बसमधून उतरल्यावर कपाळ हे एका साईडनी टम्म फुगलेलं. पण त्याची फिकीर नाय करायची. झोप सलामत तर कपाळ पचास. बरोबर एखादी पिशवी असली आणी त्यात जाड स्वेटर किंवा त्या टाईप काही असलं की मग ती पिशवी खिडकीच्या दांड्यावर ठेवून त्याचा उशीसारखा वापर करून ताणून देता येते.   कंडक्टरपण असला निवांत येतो की त्याला ओरडून सांगावस वाटत, बाबा रे मला  झोपायचं, तेव्हा पटकन माझ तिकीट काढ. मी मुद्दाम खिडकीपासली जागा पकडतो, कारण त्या दांड्यावर डोक ठेवून निवांत झोपता येत. चुकून कधी दोन लोकांच्या मध्ये किंवा कडेला बसावं लागलं की खरी बोंब होते. बराच वेळ (म्हणजे १५-२० मिनट) मोठ्या मुश्कीलिनी डोळे बळच ताणू ताणू झोप आवरायचा प्रयत्न करतो खरा पण नाईलाज को क्या इलाज!! शेवटी चष्मा वरच्या खिशात जातो आणी समोरच्या दांड्याला घट्ट पकडून ताठ बसायचा प्रयत्न करत झोपेच्या प्रवासाला सुरुवात होते. &lt;br /&gt; &lt;br /&gt;आता शिस्तीत काही झोपण जमत नाही. मग, एका बेसावध क्षणी, पहिल्यांदा डाव्या बाजूला जोरात मान पडते. शेजारचा माणूस पहिल्यांदा नुसताच खांद्यानी आपल्या डोक्याला ढुशी मारतो. मी खाडकन जागा होतो आणि ओशाळ होत, परत सरळ झोपायचा प्रयत्न करतो.  डाव्या बाजूनी असा प्रसाद मिळाल्यावर आपसूकच मान किंचित उजवीकडे कलते. आता ढुशी मारण्याची वेळ उजवीकडे बसलेल्यावर येते.  दोन्हीकडून टोले खाल्ल्यावर आता मान खाली घेऊन समोरच्या दांड्यावर डोकं ठेवतो. पण छे!! तस झोपण काही जमत नाही. हळूच बाजूच्या दोघांकडे नजर टाकतो, ज्याचा चेहेरा कमी रागीट दिसत असेल, त्या बाजूला हळूच मान कलते.  ह्यावेळी मात्र झोप बऱ्यापैकी सावध असते. फार फार तर १ - २ वेळा त्यांच्या खांद्यांवर मान जाते पण ह्यावेळी हुशारीनी, त्यांनी ढुशी द्यायच्या आत,  पटकन मान सरळ करतो.  मनात पक्क ठरवतो की पुढच्या वेळी काही झालं तरी खिडकीपाशीच बसायचं.  मला काही काही लोकांच जाम कौतुक वाटत ते शेवटच्या लांबलचक सीटवर बिनधास्त ताणून देतात. दुसरे प्रवासी येऊन त्यांना उठवायचा प्रयत्न करतात पण हे ढिम्म हलत नाहीत. ही कला मला ह्यांच्याकडून एकदा शिकायचीये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;व्यवस्थित झोप घ्यायला पण पोषक वातावरण हवं. म्हणजे उन्हाळा असेल, दुपार असेल तर आधी मजबूत आमरसाचं जेवण झालेलं पाहिजे आणि मग खोलीत पडदे बीडदे लाऊन, अंधार करून,  पंखा/कुलर लावून मग झोपण्यात जी मजा आहे ना त्याला काही तोड नाही. (गांधीजीनी बहुदा ही गोष्ट मिस  केली :-))  आणि अशा वेळी बेल वाजली की, पुलं म्हणतात त्याप्रमाणे दरवाजाबाहेर  कुबेर जरी त्याचा खजिना द्यायला आला असेल ना तरी त्याचे हात कलम करून टाकावेसे वाटतात. जेवल्या जेवल्या झोपू नये, शतपावली घालावी हे जरी बरोबर असलं तरी शतपावली घातल्यावर साली झोपच उडून जाते. आमरसाच जेवण झाल्यावर जे काय डोळे जड झाले असतात ना त्याला झोप हा एकच पर्याय आहे.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीच्या झोपेच गणितच वेगळ आहे. ९ आणि १० वाजता झोपतात ती काही खरी झोप नाही. ते उगीच काहीतरी नियम किंवा शिस्त लावून घेण्यासारख आहे. तंगड्या वर करून एखाद पुस्तक वाचत किंवा सिनेमा बघत जेव्हा डोळे जड होतील ना तेव्हा झोपायला जाव. आजूबाजूचा माणूस घोरणारा असेल तर मग सालं झोपेचं खोबर होऊन जात.  हे एक बर आहे की आपल्याला झोपेत आपलच घोरणं ऐकू येत नाही.  नाहीतर झोपणच मुश्कील झालं असतं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-4721154163422755745?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/4721154163422755745/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=4721154163422755745' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/4721154163422755745'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/4721154163422755745'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2010/03/blog-post_23.html' title='झोप आणि डुलकी'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-28686527450907202</id><published>2010-03-22T06:25:00.005+05:30</published><updated>2010-03-22T06:30:19.921+05:30</updated><title type='text'>ओर्कुटिंग</title><content type='html'>ऑर्कुट ही एक मजेदार सोशल नेटवर्किंग साईट आहे.  फेसबुक वगैरे आत्ता आत्ता भारतात जोर धरत आहे.  पण ऑर्कुट आपल्या  पब्लिक मध्ये जाम लोकप्रिय आहे. मला नेहेमी काही प्रश्न पडतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;१. समजा अमुक अमुक माणूस पुण्यात रहात असेल आणि तो १ - २  दिवसासाठी दुसऱ्या गावाला जाणार असेल तर लगेच स्टेटस मध्ये " गोइंग टु नगर/कोल्हापूर/नाशिक" तत्सम गोष्टी लोक का बर अपडेट करतात?  &lt;br /&gt;&lt;br /&gt;२. लग्नाला २ महिने राहिले असतील तर "काउंट-डाऊन बिगीन्स, ६० डेज टु गो", दुसऱ्या दिवशी परत "५९ डेज टु गो" हे असं लग्नाच्या दिवसापर्यंत लोक का बर टाकत बसतात? ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं?  &lt;br /&gt;&lt;br /&gt;३. ऑर्कुटमध्ये तुम्ही जर काही डीटेल्स अपडेट केले तर ते तुमच्या मित्र - मैत्रीणीना त्यांच्या होम पेज वर दिसतात. त्यामुळे लोकं चिन्धी चिन्धी गोष्टी अपडेट करत बसतात. उदाहरणार्थ: स्टेटस मध्ये "आयपील इज कमिंग" किंवा काहीतरी अगम्य इंग्लिश कोट टाकतात. काही लोक तर फर्स्ट नेम आणी लास्ट नेम अपडेट करतात आणी तिथे काहीतरी मेसेज टाकून ठेवतात. आता ही काही अपडेट करायची गोष्ट झाली का? जन्मापासून मरेपर्यंत तुमचं नाव काही बदलत नाही (अपवाद मुलींचा, ते पण फक्त एकदा). बर हे नाव अपडेट केल्यावर हा/ही  ओरीजनल कोण होता/होती ते जाम कळत नाहीत. मग लोक त्याला/तिला  scrap टाकून विचारतात की बाबा/बाई तू नक्की कोण?  ह्यावर त्याने/तिनी सरळ सरळ सांगावं की नाही? पण पब्लिक पण जाम  वस्ताद असतं. ओळख बर मी कोण आहे? ह्या टाईपचे खेळ सुरु करतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. काही उत्साही मंडळी तर लग्नाच्या रात्रीच लग्नाचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात. अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. ह्यावर कडी म्हणजे समजा लोक उटीला हनिमूनला गेले असतील तर रोज रात्री तिकडच्या निसर्गदृश्यांचे फोटो अपलोड  करतात.  ह्या लोकांना एवढा वेळ आणी मुख्य म्हणजे अशा वेळी ही भलतीच इच्छा कशी होत असावी? &lt;br /&gt;&lt;br /&gt;५. काही चतुर लोक तर समजा त्यांना १० फोटो अपलोड करायचे असतील तर रोज एक फोटो अपलोड करतात. म्हणजे होत काय की त्यांच्या फ्रेंड सर्कलला रोज ह्यांचे "रिसेंट अपडेट्स" दिसतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;६. टेस्टीमोनिअलला ऑर्कुट मध्ये जाम महत्व आहे. म्हणजे क्ष व्यक्तीला य व्यक्तीबद्दल जर काही लिहावस वाटल तर तो त्याच्या/तिच्याबद्दल मजेदार गोष्टी लिहितो. खर तर ही गोष्ट ऐच्छिक आहे. पण काही काही पब्लिक जाम माग लागत की माझ्याबद्दल तू काहीतरी लिही. बर त्याच्या/तिच्याबद्दल खर लिहून पण चालत नाही. य ची अशी अपेक्षा असते की असं काहीतरी लिहावं की त्याचं/तिचं फ्रेंड सर्कल जाम फिदा व्हायला हवं.  हा एक दबाव ऑर्कुट वर नेहेमी असतो :-) &lt;br /&gt;&lt;br /&gt;७. तुम्हाला रोज/वारंवार भेटणारे लोक समोरासमोर काही बोलत नाहेत, पण तिकडे ऑर्कुट वर scrap टाकत बसतात. हाऊ आर यु? खूप दिवस झाले no scrap from you. त्याला म्हणावस वाटत की भल्या माणसा, आपण इतक्या वेळा भेटतो तेव्हा तर तू काही बोलत पण नाहीस. पण तिकडे ऑर्कुट वर गेल्यावर ह्यांच्या उत्साहाला एकदम उधाण येत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;८. पब्लिक मध्ये जाम स्पर्धा असते की कोणाचे फ्रेंड्स जास्त आहेत. मग मित्राचे मित्र वगैरे आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकतात. आता ज्या माणसाला आपण कधी पाहिलं नाही त्याची रिक्वेस्ट कशी स्वीकारणार? बर समजा झाले तुमचे १००० फ्रेंड्स, पुढे काय? मला नाही वाटत की ऑर्कुटनी सगळ्यात जास्त फ्रेंड्स असाणार्याला काही बक्षीस वगैरे ठेवल असेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-28686527450907202?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/28686527450907202/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=28686527450907202' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/28686527450907202'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/28686527450907202'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='ओर्कुटिंग'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-7265032007362576916</id><published>2009-07-26T00:30:00.001+05:30</published><updated>2009-07-26T00:34:57.507+05:30</updated><title type='text'>पुस्तक परिचय (तेलाविषयक)</title><content type='html'>नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;१. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि त्यांना ह्या कंपनीवर अंकुश ठेवण्यासाठी काही कायदे निर्माण करावे लागले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकाच्या पूर्वार्धात रॉकफेलर आणि त्यांच्या स्टँडर्ड ऑईल कंपनीची वाटचाल ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. जगाची तेलाची भूक वाढल्यावर इतर देशांमधे तेल उत्खननाचे प्रयत्न सुरु झाले. अमेरीका, इंग्लंड सारख्या मोठमोठ्या देशांतील तेलकंपन्यांमध्ये जिथे जिथे तेलाचे साठे मिळण्याची शक्यता आहे अशा भूभागांसाठी तीव्र चुरस निर्माण झाली. रशियामधे तेलाचे प्रचंड साठे सापडले पण अमेरीकेबरोबर वैर असल्यामुळे पर्यायी तेलसाठ्यांचा शोध सुरु झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;इब्न सौद हा पश्चिम आशियातील एका भूभागाच्या (सौदी अरेबिया) टोळीचा म्होरक्या होता. मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांसाठीची अतिशय पवित्र ठिकाणं त्याच्या ताब्यात होती. हज यात्रेसाठी येण्यार्‍या भाविकांकडून करापोटी जी रक्कम मिळायची तेच त्यांच्या राज्याचं उत्पन्नाचं मुख्य साधन होतं. पण जागतिक महायुद्धामुळे भाविकांचं प्रमाण कमी झालं आणि इब्न राजाला चांगलाच फटका बसला. असं म्हणतात की त्यावेळी राज्याचा खजिना एका ऊंटाच्या पाठीवर मावेल एवढाच राहिला होता. अशा हलाखीच्या परिस्थितीत, भूगर्भ शास्त्रज्ञांनी सौदीच्या भूमीत तेलाचे प्रचंड साठे आहेत असा निर्वाळा दिला. अमेरीकन तेल कंपन्यांनी इब्न सौदशी पुढील ६० वर्षांचा करार केला (तो २००३ मधे संपला). इथे एक मजेदार किस्सा सांगितला आहे. इंग्लंड आणि अमेरीका दोघेही ह्या इब्न सौदला खुश करण्याचा प्रयत्न करत होते. अमेरीकेनी&lt;br /&gt;एका मोठ्या जहाजावर त्यांच्यासाठी पार्टी ठेवली आणि इंग्लंडने रत्नजडीत रोल्स रॉईस त्यांच्या भेटीसाठी पाठवली. इंग्लंडमधल्या गाड्यांचं स्टिअरिंग उजव्या बाजूला असतं आणि इब्न सौद हे नेहेमी ड्रायवरच्या शेजारीच बसत, मागे नाही. ड्रायवरच्या डाव्या बाजूला बसणं त्यांना अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी ती गाडी तशीच त्यांच्या भावाला देऊन टाकली. गाडी भेट (लाच) देताना ही साधी गोष्ट इंग्लंडच्या लक्षात आली नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर ह्या पुस्तकात, तेल असण्यार्‍या देशांच्या दोन महत्वाच्या संघटनांची (ओपेक आणि आओपेक) माहिती देण्यात आली आहे. तेलकंपन्यांची मनमानी आणि भाववाढ/घट करताना जिथून तेल उपसत आहे त्या देशांना कसलीही किंमत न देणं ह्याला आळा बसावा ह्या हेतूनं ह्या संघटनांची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला जरी तेलकंपन्यांनी ह्या संघटनांना महत्त्व दिलं नाही तरी काही वर्षातच ओपेकने त्यांच्या नाकी दम आणला. सद्दाम हुसेननी कुवेतवर आक्रमण करुन ते तेलसाठे बळकावयचा सतत प्रयत्न केला त्याचंही वर्णन केलं आहे. सद्दाम जरी अमेरिकेसाठी वाईट असला तरी आंतरराष्ट्रीय परिषदेत त्याने कायम भारताची बाजू घेतली होती हेही लेखकाने नमूद केलं आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात भारताच्या ओएनजीसी ह्या पेट्रोलियम कंपनीचा आढावा घेण्यात आला आहे. के.डी.मालवीय ह्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आज ओएनजीसी उभी आहे. स्वकीयांचा तसेच अमेरिकेसारख्या देशांचा विरोध पत्करून त्यांनी उत्खनन चालू ठेवले त्याचं उत्तम वर्णन लेखकानं केलं आहे. भारत आणि इराणदरम्यान (पाकिस्तानमधून) तेलवाहक पाईपलाईन टाकायचं काम सुरु होणार होतं. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानकडून मोठ्या मुश्किलीनी आपण परवानगी मिळवली होती पण केवळ अमेरिकेच्या दबावामुळे आपण ते काम थांबवलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेलाचा शोध, त्याची उपलब्धता आणि त्यावरुन खेळलं जाणारं जागतिक राजकारण ह्याचा सुंदर आढावा ह्या पुस्तकात घेण्यात आला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;२. एका तेलियाने: गिरीश कुबेर ह्यांचं पुढचं पुस्तक म्हणजे एका तेलियाने. ह्या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे - शेख अहमद झाकी यामानी . हा माणूस सौदी अरेबियाचा तेलमंत्री होता. उच्चविद्याविभूषित आणि तेलाच्या राजकारणातले बारकावे समजणारा. पुस्तकाच्या मागील बाजूस त्याची सुंदर ओळख करुन देण्यात आली आहे.&lt;br /&gt;" हा आजारी पडला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची. हा प्रसन्न झाला तर अनेक देशांमधे दिवाळी साजरी व्हायची. ह्याच्या भेटीसाठी अनेक देशांचे प्रमुख तासन् तास ताटकळत बसायचे." &lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेने पश्चिम आशियातील तेलउत्पादक देशांना नेहेमी कमी लेखलं. त्यांना अविकसित समजून त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे ह्या देशांमधे अमेरिकेच्या विरोधात प्रचंड द्वेष निर्माण झाला. ह्या महासत्तेला शह देण्याचं काम लिबियाचे सर्वेसर्वा कर्नल गडाफी आणि यामानी ह्यांनी पद्धतशीरपणे केलं. यामानींचा जन्म १९३० मधे मक्केत झाला. राजे फैजल (इब्न सौद ह्यांचे पुत्र) ह्यांनी त्यांची तेलमंत्री म्हणून निवड केली. ती यामानी ह्यांनी अगदी सार्थ ठरवली. राजे फैझल ह्यांचं यामानींवर स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम होतं. यामानी ओपेक आणि सौदी अरेबिया सरकारचे २५ वर्षं मंत्री होते (१९६२-१९८६). ह्या काळात त्यांनी तेलखात्याचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;राजे फैझल ह्यांच्याबद्दलही लिहीलं आहे. टेलिफोन, रेडीओ, टीव्ही, स्त्री-शिक्षण अशा अनेक सुधारणा त्यांनी सौदी अरेबियात आणल्या. अर्थातच त्यांना मुल्ला-मौलवींकडून प्रचंड विरोध झाला. मुलींच्या शाळेची जबाबदारी तर त्यांनी आपल्या पत्नीवरच टाकली होती. यामानी ह्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला. दोघांमधे गैरसमज नसल्यामुळे राजे फैझल ह्यांचे यामानींविरुद्ध कान कोणीही भरवू शकले नाही. १९७३ मधे झालेल्या तेलसंकटामुळे यामानी सगळ्या जगाला माहिती झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्रप्रमुखांनी इब्न सौद ह्यांना शब्द दिला होता की ते इस्त्राईलची बाजू घेणार नाहीत. तो शद्ब मोडून अरब-इस्त्राईल युद्धात अमेरिकेने इस्त्राईलला मदत केली आणि अरब राष्ट्रांमधे अमेरिकेविरोधात संतापाची लाट उसळली. लिबियाचे कर्नल गडाफी ह्यांनी सगळ्या तेल कंपन्यांचं राष्ट्रियीकरण करुन टाकलं. ते फारच आक्रमक आणि अमेरिका-विरोधी होते. तेलाचे भाव एकदम दुप्पट करण्याची मागणी त्यांनी ओपेकच्या मिटींगमधे केली. एकदा तर ओपेकची मिटींग लिबियात भरलेली असताना त्यांनी सगळ्या देशाच्या मंत्र्यांचं अपहरण करण्याची योजना आखली होती. पण यामानींना ह्याचा सुगावा लागला आणि त्यांनी शिताफिने तिथून ग्रीसमधे पलायन केल्याने पुढचा प्रसंग टळला. पण काही दिवसांनी ओपेकच्या सर्व मंत्र्यांचं कार्लोस द जॅकल ह्या कुख्यात दहशतवाद्यानं अपहरण केलं त्याला फक्त यामानी आणि इराणच्या तेल मंत्र्यांना मारायचं होतं. पण परत एकदा यामानींनी शिताफीनी सुटका करुन घेतली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या पुस्तकात सौदी अरेबिया बरोबरच इराणमधलं सत्ता-स्थित्यंत्तर, पॅलेस्टिनी नेते यासर अराफत आणि जॉर्डनचे राजे हुसेन आणि इस्त्राईल) ह्यांच्यातल्या संघर्षाचं वर्णन आहे. पॅलेस्टिनी बंडखोरांनी जॉर्डनमधे घुसखोरी केली होती आणि तिथून ते इस्त्राईलवर हमला करायचे. ह्या दोघांमधे जॉर्डनची जनता पुरती कावून गेली होती. ह्या पॅलेस्टिनी बंडखोरांची एवढी दहशत होती की एकदा जॉर्डनमधल्या एका पोलिसाची त्यांनी हत्या केली, त्यांचं मुंडकं कापलं आणि त्याचा फुटबॉल करुन खेळले. यामागे जॉर्डनच्या लोकांवर दहशत बसवायचा त्यांचा हेतू होता. शेवटी राजे हुसेन एवढे वैतागले की त्यांनी जोरदार हमला करून जवळपास ५००० बंडखोरांना मारलं. असं म्हणतात की तेव्हा इस्त्राईलनी जेवढे पॅलेस्टिनी बंडखोर मारले नसतील तेवढे राजे हुसेन ह्यांच्या सैन्याने मारले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ओपेक असो किंवा अमेरिका असो, सगळ्यात जास्त महत्त्व सौदी अरेबियाला. कारण तिथे निघणारं तेल हे इतर ओपेक देशांच्या एकत्र तेलापेक्षा जास्त होतं. त्यामुळं सौदी अरेबियाची पश्चिम आशियातल्या राजकारणात नेहेमी मध्यवर्ती भूमिका राहिली आहे. यामानींनी लिबिया, सिरीया सारख्या माथेफिरू अरब देशांना जवळपास २५ वर्ष कुशलतेने हाताळलं आणि ओपेकला सामर्थ्यवान बनवत गेले. १९७३ च्या ऑईल क्रायसिमधे ओपेक देशांनी उत्पादन कपात २५ टक्क्यांपर्यंत वाढवली आणि पाश्चिमात्य देशांना जेरीस आणले. अमेरीकन लोकांना कधी माहित नसलेल्या तेल-टंचाईला सामोरं जावं लागलं. तेव्हा अमेरिकन गाड्या लिटरला ४-५ किमी धावायच्या. (हॅमर सारखी गाडी तर लिटरला १ किमी देखील धावत नसे) तेल संकटामुळे फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवणं त्यांना भाग पडलं. (जपान आधीपासूनच अशा फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवत होता.) ह्या काळात पेट्रोल-पंपावर लांबलचक रांगा लागत होत्या. त्यात परत अमेरिकन लोक रांगेत असताना एक क्षणसुद्धा गाडी बंद करत नव्हते. शेवटी सरकारला एक दिवसाआड पेट्रोल देण्याची सक्ती करावी लागली. (म्हणजे सम आकडा असलेल्या गाड्या एका दिवशी तर विषम नंबर असलेल्या पुढच्या दिवशी). इंग्लंडमधे तर तीनच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला. घड्याळ दोन तास पुढे करण्यात आलं. त्यामुळे मुलांना सकाळी ७ च्या ऐवजी पहाटे पाचलाच शाळेसाठी निघावं लागे. त्यामुळे अपघात वाढले आणि पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचंच बंद केलं. ह्या काळात यामानींनी प्रमुख देशांचा दौरा केला (फ्रान्स, जपान, इंग्लंड, इत्यादी.) आणि त्यांना विश्वासात घेऊन तुमचा तेल पुरवठा पूर्ववत चालू राहिल असं आश्वासन दिलं. अखेर ओपेक (म्हणजे यामानी) पुढे अमेरिकेला माघार घ्यावी लागली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यामानींनी नेहेमी तेलउत्पादक आणि तेल कंपन्या/ग्राहक देश ह्यांच्यात समन्वय साधला. इराण, लिबिया तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरल अशी प्रचंड भाववाढ मागत असताना त्यांना शांत ठेवायचं काम यामानींनी केलं. १९७५ मधे राजे फैझल ह्यांची हत्या झाल्यावर (ह्यामागे अमेरिका असल्याचा संशय आहे) सौदीला परत त्यांच्यासारखा दुरद्रुष्टि असणारा राजा लाभला नाही. नव्या राजाचा अर्थातच यामानींवर आकस होता. १९८६ मधे त्यांना टीव्हीवर कळाले की त्यांना तेलमंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सौदीचा र्‍हास सुरु झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तेलातून मिळणारा पैसा किती असावा? असं म्हणायचे की सौदी राजपुत्र एवढे माजले होते की गाडीतला अ‍ॅश ट्रे भरला की ते नवीन गाडी घ्यायचे. पैसा अक्षरशः नाकातोंडात जायला लागला होता. एका सौदी बँकरने सांगितले की त्याच्या स्वतःच्या घरात ५ माणसं आहेत. त्यांच्यासाठी ६ नोकर आणि ९ गाड्या. त्याच्या म्हणण्यानुसार हा अतिपैसा आहे. ह्याची इतकी सवय झाली आहे की उद्या तो नसेल तेव्हा काय करणार? &lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या यामानी लंडनमधे राहतात आणि तेलाच्या राजकारणापासून दूर झाले आहेत. सौदीच्या नवीन राजाने त्यांना तेलमंत्रीपद स्विकारण्यासाठी आमंत्रण पाठवलं पण त्यांनी नकार कळवला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जगाच्या राजकारणाचं मध्यबिंदू असणारं हे तेल आणि त्याचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. विषय किचकट असूनही गिरीश कुबेरांनी तो सोपा आणि सहज समजेल असा मांडला आहे. इतिहास आणि जागतिक राजकारणाची आवड असणार्‍यांनी ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचावी.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-7265032007362576916?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/7265032007362576916/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=7265032007362576916' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/7265032007362576916'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/7265032007362576916'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='पुस्तक परिचय (तेलाविषयक)'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-5444115162263235811</id><published>2009-07-26T00:23:00.000+05:30</published><updated>2009-07-26T00:28:53.871+05:30</updated><title type='text'>चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)</title><content type='html'>मागच्या आठवड्यात मित्राने झेटगिस्ट (Zeitgeist) नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म पहायला दिली. ही फिल्म २००७ मधे पीटर जोसेफ नावाच्या माणसाने बनवली. झेटगिस्ट एक जर्मन शब्द आहे. ज्याचा डिक्शनरीप्रमाणे अर्थ होतो - the spirit of the time; general trend of thought or feeling characteristic of a particular period of time. जवळपास दोन तासांची ही फिल्म खालील तीन भागात मांडली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भाग १. आत्तापर्यंत सांगितली गेलेली सर्वोत्कृष्ट कथा (येशूच्या अस्तित्वाचा शोध): पुरातन काळापासून (धर्म अस्तिवात यायच्या आधीपासून), सूर्याला लोक प्रचंड मानतात. सूर्य हा प्रकाशाचा स्त्रोत असल्यामुळे लोकांचं दैनंदिन जीवन तो उगवल्यानंतरच सुरु व्हायचं. झाडं, शेतातील पिकं सूर्यप्रकाश मिळाल्यावरच वाढायची. अर्थातच, त्यामुळे सूर्याला (म्हणजे प्रकाशाला) चांगल्या गोष्टींचं/प्रवृतींचं प्रतीक तर अंधाराला वाईट मानायला सुरुवात झाली. त्यामुळे हळूहळू सूर्याला देवत्व बहाल केले गेलं. अतिप्राचीन इजिप्त संस्कृतीमधे होरसला सूर्यरुपी देव मानत. ह्या होरसशी प्रचंड साधर्म्य असणारे कित्येक देव नंतर इतर संस्कृतींमधे उदयाला आले. अटिस, डायनिसस, मित्रा, येशू, इत्यादि ( ह्यामधे कृष्णाचापण संदर्भ देण्यात आला आहे). ह्या सर्वांमधे साधर्म्य आहे ते म्हणजे - ह्या सर्वांचा जन्म कुमारी मातेपासून २५ डिसेंबरला झाला . ह्या सर्वांना १२ भक्त होते, मेल्यानंतर ३ दिवस पुरण्यात आलं आणि नंतर संजीवनी (resurrection) मिळाली. तसेच ह्या देवांनी केलेल्या चमत्कारांमधे सुद्धा विलक्षण समानता आहे. प्रश्न असा पडतो की २५ डिसेंबरच का? तर २१ आणि २२ डिसेंबरच्या दरम्यान दिवस सगळ्यात छोटा असतो (winter solstice). त्यानंतर साधारण तीन दिवसांनी म्हणजे २५ डिसेंबरपासून दिवस वाढायला सुरुवात होते. म्हणजे (सूर्य देवाचा) प्रकाश वाढायला सुरुवात होण्याचा हा दिवस. त्यामुळेच ह्या सर्व देवांचा जन्म २५ डिसेंबरला दाखवला गेला. ह्या मुद्याप्रमाणेच ओरियन पट्टयामधलया आकाशातल्या तीन तारकांना तीन राजांची उपमा देणे, १२ राशी (म्हणजेच १२ फॉलोअर्स), काही वर्षांनंतर जग संपणार अशी जी ख्रिश्चन धर्मियांमधे धारणा आहे ( तशी ती हिंदूमधेही आहे म्हणा... कलियुगात जगबुडी होणार वगैरे) ते खरं पाहता साधारणपणे प्रत्येक २१५० वर्षांनंतर पृथ्वी एक घर सोडून मागील राशीत जाते अशी संकल्पना आहे. त्यानुसार सध्या मीन राशीत असलेली पृथ्वी काही वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. ह्या स्थित्यंतरालाच लोक जगबुडी मानत आहेत. अशा अनेक फसव्या धार्मिक कल्पनांवर ह्या फिल्ममधे कडाडून हल्ला चढविण्यात आला आहे. येशू होऊन गेला ही तद्दन खोटी गोष्ट असून केवळ मूठभर लोकांनी समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला बनाव आहे आणि येशू ही सरळसरळ होरसची कॉपी आहे असं दाखवण्यात आलं आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भाग २. ११ सप्टेंबर (९/११) चं रहस्य: : ११ सप्टेंबर, २००१ ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर जो हल्ला झाला तो ओसामा बिन लादेन आणि अल कायदानी केला असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या समजाला छेद देणारं सत्य ह्या भागात मांडलं गेलं आहे. अमेरीकन सरकारला ह्या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. त्यांनी जाणीवपूर्वक विमानं घुसू दिली. पेंटागॉनवर ज्या अतिरेक्याने हल्ला केला त्याला तर नीट विमान चालवताच येत नव्हतं. ७ नंबरच्या बिल्डींगवर विमान हल्ला झाला नसूनही ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळली. हल्ला झालेल्या तीन जागांपैकी दोन जागांवर कुठेही विमानाचे अवशेष सापडले नाहीत. एका फुटेजमधे तर विमान बिल्डींगच्या अगदी जवळ येतंय आणि ते धडकायच्या आतच खालच्या एका मजल्यावर स्फोट होताना दाखविला आहे. लादेनचं फुटेज - ज्यात त्यानी ह्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली - त्यातला लादेन हा बहुरूपी असून त्याच्या आणि खर्‍या लादेनमधले ठळक फरक सांगितले आहेत. ह्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी जी समिती बसवण्यात आली तिचा अध्यक्ष बुशच्या मर्जीतलाच होता. चौकशी समितीला बुशनी उडवाउडवीचीच उत्तरं दिली. ह्या सगळ्याचं चित्रीकरण करायला प्रसारमाध्यमांना बंदी घातली गेली. ९/११ चौकशी समितीच्या अहवालाची प्रत पहायची परवानगी नाकारण्यात आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रश्न असा पडतो की अमेरिकेला असं करुन काय मिळालं? तर अमेरिकेला अफगाणिस्तानमधे शिरकाव करता आला. त्यायोगे ह्या तेलपिपासू राष्ट्राला सिरीया आणि इराण ही तेलसंपन्न राष्ट्रे ताब्यात घेता येतील (इराक वर तर अगोदरच कब्जा झाला आहे). &lt;br /&gt;&lt;br /&gt;भाग ३. पडद्यामागचे खरे सूत्रधार: ह्या भागात अमेरीकेचा थोडासा इतिहास - इंग्लंड मधून कॉलनीज वेगळं व्हायचं कारण - सांगितला आहे. (इंग्लंडच्या राजाने जेव्हा ह्या कॉलनीजचं चालू चलन रद्द करुन स्वतःचं चलन व्याज आकारुन देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा असंतोष पसरुन ह्या कॉलनीजनी बंड केलं.) फेडरल रिझर्व बँक ही अमेरीकेतील मुख्य बँक आहे (जशी आपली रिझर्व बँक ऑफ इंडिया). ही बँक पूर्णपणे खाजगी असून सरकारचं तिच्यावर अजिबात नियंत्रण नाही. ही बँक सरकारला चलन पुरवते. प्रत्येक चलनामागे ती विशिष्ट व्याज आकारते. ह्याचा अर्थ जेव्हा सरकार बँकेकडून पैसे घेते तेव्हाच ते कर्जबाजारी झालेलं असतं. मग हे कर्ज फेडणार कसं? तर त्यासाठी परत बँकेकडूनच पैसे घ्यायचे. अशा रितीने सरकार बँकेच्या कर्जाच्या विळख्यात अडकत जाते. मग बँक पैसा कुठुन मिळवते? युद्ध हा बँकेसाठी कमाईचा सर्वात फायदेशीर मार्ग आहे. पहिले आणि दुसरे महायुद्ध, व्हिएतनामचे युद्ध ह्यामधे भाग घ्यायला सरकारला सरकारला भाग पाडलं. गंमत म्हणजे बँक दोन्ही पक्षांना शस्त्रे वगैरे खरेदी करायला पैसे (उदा: जर्मनी आणि अमेरीका) उधार देत असे. व्हिएतनामचे युद्ध तर मुद्दामच लांबवलं गेलं आणि त्यायोगे बँक पैसा कमवत गेली. बँकेच्या धोरणांना विरोध करणारे काँग्रेसमन लुईस मॅकफेडन ह्यांची हत्या झाली. फिल्ममेकरच्या मते बँक लोकांकडून आकारत असलेला उत्पन्नावरचा करसुद्धा बेकायदेशीर आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी असं दाखवलं आहे की ह्या लोकांचा जगभरात एकछ्त्री सरकार स्थापन करण्याचा इरादा आहे. उत्त्तर अमेरीका, युरोप, आफ्रिका आणि एशिया अशा चारही खंडाना एकत्र करुन सगळ्या जगावर सत्ता गाजवण्याचं ह्यांचं स्वप्न आहे. सगळीकडे एकच चलन असेल (कॅनडा, मेक्सिको आणि अमेरीकेनी २००५ मधे एक गुप्त ठराव करून त्याद्वारे अमेरो नावाचं एक कॉमन चलन काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणालाही विशेष माहिती नाही. ) आणि प्रत्येकाच्या शरीरात आरएफआयडी चिप बसवण्यात येईल आणि त्यायोगे कोण कुठे केव्हा काय करत असेल हे सगळं ट्रॅक करता येईल. जो विरोधात जाईल त्याची ही चिप बंद करण्यात येईल आणि त्यायोगे त्याचा जगाशी संपर्कच तुटेल. धर्म, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली हे लोक सगळ्यांमधे फूट पाडून त्यांच्यावर अंमल गाजवत आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अतिशय स्फोटक अशी ही डॉक्युमेंटरी फिल्म असं सांगून जाते की एखादी (खोटी) गोष्ट तुमच्या मनावर सतत बिंबवली की तुम्हाला ती खरी वाटायला लागते. शिक्षणाचा दर्जा सुधारावा असं सरकारला अजिबात वाटत नाही कारण जर लोक सुजाण झाले तर ते ह्या सगळ्याला विरोध करतील. त्यामुळे सगळा भर हा मनोरंजन उद्योगाकडे देण्यात येत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;झेटागिस्ट अ‍ॅडेंडम अशी पुढचा भाग निघाली आहे. पण मी तो अजून पाहिली नाही. कोणी पाहिली असल्यास त्याबद्दल जरूर माहिती द्यावी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(ह्या लेखातील विचार माझे नसून फिल्ममधे काय मांडलं आहे ते येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-5444115162263235811?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/5444115162263235811/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=5444115162263235811' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/5444115162263235811'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/5444115162263235811'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2009/07/zeitgeist.html' title='चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-23761136922487888</id><published>2008-06-20T15:01:00.004+05:30</published><updated>2008-06-23T14:08:33.288+05:30</updated><title type='text'>मौशुमी</title><content type='html'>लाइट गेले, त्यामुळे  पंखा बंद झाला आणि पंखा बंद करायचं अन मला जाग यायचं स्विच एकच असल्यासारखं मी खाडकन झोपेतनं जागा झालो. खोलीत चांगलाच उजेड दिसला.  हात लांब करुन मोबाईलवर किती वाजले ते पाहिलं. ०९:०० अस दिसताच शिSSSSट अस जोरात ओरडुन पांघरुण बेडच्या दुसर्‍या कोपर्‍यात भिरकावुन दिलं. झोपेतनं नुकतच उठल्यावर बहुतेक वेळा आवाज जड असतो.  तो इफेक्ट जायच्या आत बॉसला फोन लावला. बर वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला थोडासा उशीरा येईन अस त्याला सांगितलं. लाइट गेल्यामुळे गिझरचा काही उपयोग नाही. त्यामुळे गार पाण्याने पटकन आंघोळ उरकली. बरं वाटत नाहीये अशी थाप मारली खरी पण ह्या गार पाण्यानी खरचचं आजारी पडायचो असा विचार करत घराबाहेर पडलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑफिसमधे पोहचेस्तोवर १२ वाजुन गेले होते. डेस्कजवळ आल्यावर पाहिलं तर माझ्या जागेवर एक मुलगी बसली होती.  अरे मी चुकुन दुसर्‍याच फ्लोअरला आलो की काय असा विचार करत होतो तेवढयात बॉसनी मागुन येऊन पाठीवर थाप मारली. काय हिरो बर वाटतय का आता?  मी आवाज शक्य तितका खोल नेत म्हणालो हां.. ठीक आहे आता.  ओके.. मौसमी अशी त्याने माझ्या जागेवर बसलेल्या मुलिकडे बघुन हाक मारली.  येस सर अस म्हणत ती पटकन उभी राहिली. ती सर म्हणाल्यावर मी लगेच ओळखलं की ही नक्कीच फ्रेशर आहे. ये अनिश है और अनिश ये मौसमी.... आजसे ये हमारे टीम मे काम करेगी.  मग बॉसने तिला काय काय माहिती द्यायची आहे, तिला काय काय येतं ह्याची कॅसेट वाजवायला सुरुवात केली. ओके, आय नो, गॉट इट, आय विल टेक केअर ऑफ इट अशी समारोपाची वाक्यं टाकुन सुद्धा काही उपयोग झाला नाही. शेवटि ए आणि बी अशा दोन्ही साइडची कॅसेट वाजवुन मगच त्याने आमचा पिच्छा सोडला.     &lt;br /&gt;&lt;br /&gt;मग मी वळुन तिच्याकडे नीट पाहिलं. एकदम टपोरे डोळे होते तिचे. मी तिला बस म्हणालो आणि पलिकडची एक रिकामी खुर्ची ओढुन स्वत:साठी घेतली.  मला पटकन तिचं नावच आठवेना. स्वत:चा खुप राग आला. सॉरी आय फरगॉट  युअर नेम...मी खजिल होत म्हणालो.  ओह.. नो प्रॉब्लेम, मायसेल्फ मौशुमी... अस म्हणत तिनी हात पुढं केला.  ते "मौशुमी" ती इतकं छान म्हणाली की बास......... मग हा बॉस मौसमी काय म्हणतो तिला. ते अगदी "मोसमी वारे"तलं मोसमी वाटतं.  बरं झालं मी हिला नाव विचारलं; नाही तर मी पण येडछाप सारखं तिला मौसमी म्हणालो असतो. है शाब्बास असं मनाशी म्हणत मी स्वत:ची पाठ थोपटुन घेतली आणि आपला बॉस हा एकदम भुक्कड आहे ह्याची परत एकदा खात्री पटली. "मायसेल्फ अनिश" शक्य तेवढया स्टाइलने म्हणण्याचा प्रयत्न केला.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;फार काळ इंग्लिशमधे बोलावं लागलं की मला गुदमरल्यासारखं होतं.  "आपको शिफ्ट मे आना पडता है क्या?" असं विचारुन तिनीच माझी सुटका केली.  "अरे नही नही.... आज थोडा बीमार था, इसलिये लेट आया." तेवढयात तिचा मोबाइल वाजला. एक्सक्युज मी म्हणत तिनी फोन घेतला. "हां आई पोहोचले मी ऑफिसमधे वेळेवर. हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आला. आई मी जरा कामात आहे. लंच-ब्रेक मधे करीन फोन. ओके? चल बाय.." अस म्हणत तिनी फोन ठेवला. च्या मारि... ही तर मराठी आहे की. छातीवरुन एकदम इंग्लिशचं दहा आणि हिंदीचं पाच किलोचं वजन उतरल्यासारखं वाटलं.  ती माझ्याकडे बघुन हसली. संभाषणाची गाडी परत हिंदी/इंग्लिशकडे जाण्याआधी मी पटकन विचारलं "कुठे रहाता तुम्ही?" &lt;br /&gt;"औंधला!"&lt;br /&gt;"अच्छा!!! मग  ऑफिसला कशा येता? वायुने?" (आमच्या ऑफिसच्या बसचं नाव वायु आहे) &lt;br /&gt;"नाही पीएमटीने. सोमवारपासुन येणारे वायुने."&lt;br /&gt;"ओह... आय सी". मग मी तिला प्रोजेक्टची थोडी-फार माहिती दिली. कामाचं स्वरूप समजावलं.  तिला काय काय शिकावं लागेल ते पण सांगितलं. हे सगळं ती तिच्या काळ्याभोर,टपोर्‍या डोळ्यांनी माझ्याकडे पहात लक्षपुर्वक ऐकत होती. त्यामुळे मला दडपण आल्यासारखं होत होतं. दहा-पंधरा लोकांसमोर प्रेझेंटेशन देताना येतं तसं टेन्शन यायला लागलं होतं मला. कधी एकदा हे ज्ञानदानाचं कार्य संपवुन संभाषणाची गाडी परत इन्फॉर्मल टॉकवर नेतो असं झाल होतं. तेवढयात बॉसनी तिला बोलावलं. मग टीममधल्या इतरांशी ओळखी, राहिलेलं डॉक्युमेंट सबमिशन, इंडक्शन ह्यातच तिचा उरलेला दिवस गेला. जाताना मला आवर्जुन बाय करुन गेली. मी ऑफिसमधे बारा वाजता उगवल्यामुळे नेहेमीसारखं सात वाजता निघणं काही बरोबर दिसलं नसतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्हाला दोघांना एकाच मॉडयुलवर काम करायचं असल्यानं तिला माझ्या शेजारचाच पीसी मिळाला. थोडयाच दिवसात माझ्या लक्षात आलं की मौशुमी खुप बडबडी आहे. एकदम छान टयुनिंग जमलं आमचं मग.  एकदा असचं बोलता बोलता तिला म्हणालो "पहिल्यांदा तुझ्या नावावरुन मला वाटलं की तु बंगालीच आहेस.  पण तुला तुझ्या आईशी बोलताना ऐकलं तेव्हा कळालं की तु मराठी आहेस ते."  त्यावर माझ्याकडे रोखुन पहात ती म्हणाली "अरे मी अर्धवट आहे."&lt;br /&gt;"म्हंजे?"&lt;br /&gt;"म्हणजे मी अर्धी बेंगॉली आणि अर्धी मराठी आहे. माझे पपा बेंगॉली तर ममी मराठी आहे. लव मॅरेजे त्यांचं.. मग झाले की नाही मी अर्धवट." डोळे मिचकावत ती म्हणाली.  &lt;br /&gt;"तुझ्या ह्या असल्या लॉजिकनी मला तर पुर्णचं वेडा म्हणावं लागेल."  ह्यावर ती एकदम खळखळुन हसली. "यु आर टु मच ऍनी!!!" ऍनी........वा काय मस्त शॉर्टफॉर्म केलाय माझ्या नावाचा. नाहीतर माझे आई-बाबा. बाबा अन्या म्हणतात (एकदम चमन वाटतं ते) तर आई त्याच्यापेक्षा भारी नावानी हाक मारते - "अनु" म्हणुन. किती वेळा सांगितल आईला की ते मुलीचं नाव वाटतं. पण त्यावर तिचं एकच ठरलेलं उत्तर "तुम्हा मुलांना नाही कळणार आईचं प्रेम कधी".  आता काही तरी संबंध आहे का त्याचा प्रेमाशी? पण आईला कोण समजावणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक दिवस माझ बॉसशी कडाक्याचं भांडण झालं. माझा एकदम मुडच गेला मग.  मी उदासपणे कॅंटीनमधे बसुन चहा पित होतो. तेवढयात मौशुमी आली. माझा उतरलेला चेहेरा पाहुन म्हणाली "काय रे तुझा असा रामदीन का झालाय?" &lt;br /&gt;"रामदीन? म्हंजे?"&lt;br /&gt;"अरे कोणी असा दीनवाणा किंवा बापुडा चेहेरा करुन बसलं की आम्ही त्याला रामदीन किंवा दिनदयाळ म्हणतो." मला मनापासुन हसु आलं. &lt;br /&gt;"बरं काय झालं ते पटकन सांग बघु."  मग  मी तिला काय झालं ते सगळं सांगितल.&lt;br /&gt;"एवढच ना?  मग त्यात इतकं उदास व्हायला काय झालं? झालं गेलं विसरुन जा आता. पहिले तुझा मोबाइल स्विच ऑफ कर. गोविंदाचा एक धमाल पिक्चर आलाय. तो पहायला जाऊ. उद्याचं उद्या पाहु. मला काहीही कारणं नकोयेत तुझी." मग आम्ही तो पिक्चर पाहिला. एकदम दिलखुलास हसत होती ती प्रत्येक जोकला. माझा पण मुड एकदम फ्रेश झाला. पिक्चर संपल्यावर म्हणाली "चल आता मी तुला कलकत्त्याला नेऊन आणते."&lt;br /&gt;"म्हंजे?"&lt;br /&gt;"चल रे तु फक्त. प्रश्नच फार असतात तुझे." &lt;br /&gt;ती मग मला चतुश्रुंगी पासल्या 'राधिका' नावाच्या बंगाली मिठाईच्या दुकानात घेऊन गेली.  मी रसगुल्ले खाल्ले होते आधी पण तिनी मला 'खीरकदम' आणि 'संदेश' खाऊ घातले.  खीरकदम तर जाम आवडलं आपल्याला. एकदम टकाटक मुड झाला मग माझा.  शेवटी जाताना मी तिला थॅंक्स म्हणालो. त्यावर म्हणाली "अरे थॅंक्स नको म्हणुस. आता माझा जर कधी मुड गेला तर तुला पण माझ्यासाठी असचं काहितरी करावं लागेल." &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण तिनी तशी संधी कधी दिलीच नाही मला. कायम उत्साही आणि आनंदी असायची ती. एके दिवशी ऑफिसमधे यायला मला परत एकदा उशीर झाला.  पाहतो तर काय मौशुमी बॉसला खुप बोलत होती.  तु वेळेत काम पुर्ण करत नाहीस.  जबाबदारी घेत नाहीस असं काहितरी बोलला तिला तो.  त्यावरुन हे जोरदार भांडण चालु होतं. बॉस मात्र आत्ता काहीच बोलत नव्हता तिला. मला एकदम आश्चर्य वाटलं. आम्हाला कायम धारेवर धरणारा हा माणुस तिचं मात्र शांतपणे ऐकुन घेत होता.  दुसर्‍या दिवशी तो ऑफिसला आलाच नाही. संध्याकाळी समजलं  की त्याचा चार वर्षॉंचा मुलगा अचानक गेला म्हणुन. लगेच आम्ही त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो आणि हॉलच्या कोपर्‍यात मान खाली घालून चुपचाप बसलो.  हळुच एकदा मान वर करुन पाहिलं -  रडुन रडुन बॉसच्या बायकोचे डोळे सुजले होते.  बॉस तर एकदम उध्वस्त झाल्यासारखा दिसत होता. तेवढयात मौशुमी उठली आणि सगळी सुत्र तिनी हातात घेतली. जे कोण लोक भेटायला येत होते त्यांच्याशी जुजबी बोलणं, कोणाला काय हवं नको ते बघणं, लॅंडलाइनवर आलेले फोन घेणं हे सगळं ती न सांगता हॅंडल करत होती. निघताना तिनी बॉसला सांगितल की तुम्ही एवढयात येऊ नका ऑफिसला.  आम्ही सर्व हॅंडल करु. नंतरचे जवळजवळ दहा बारा दिवस ती सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत ऑफिसमधे थांबायची. सगळ्यांशी कोऑर्डिनेट करुन बॉसची बर्‍यापैकी कामं/जबाबदार्‍या सांभाळल्या तिनं.  तिच्या स्वभावातली ही दोन्ही टोक पाहुन मी अवाक झालो.    &lt;br /&gt;&lt;br /&gt;चांगल्या माणसांच्या सहवासाला अल्पायुषी असण्याचा शाप असावा बहुदा.  काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी कलकत्त्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला.  तिलाही त्यांच्यासोबत जाणं भाग होतं.  ऑफिसमधे सेंड-ऑफच्या वेळी तिचा सगळ्यात चांगला मित्र म्हणुन मला दोन शब्द बोलायला सांगितल बॉसनी. "मौशुमी थॅंक्स फॉर एव्हरीथिंग" एवढच बोलु शकलो मी. निघताना सगळ्यांचा निरोप घेऊन शेवटी ती माझ्या इथे आली.  माझा चेहेरा पाहुन म्हणाली "आता परत तुला रामदीन म्हणायला नको लाऊस हां...".  तिला जाताना पाहुन नकळत डोळ्यांतुन पाणि आलं.  तिनी जर मला अस रडताना पाहिल असतं तर कोणत नाव दिलं असतं ह्याचा विचार करुन मला एकदम हसु आलं.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-23761136922487888?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/23761136922487888/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=23761136922487888' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/23761136922487888'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/23761136922487888'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2008/06/blog-post_20.html' title='मौशुमी'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-1416457273875957842</id><published>2008-06-18T09:53:00.001+05:30</published><updated>2008-06-18T10:14:20.923+05:30</updated><title type='text'>एक छोटीशी सकाळ</title><content type='html'>झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधुन उतरली. चरफडत तिने आजुबाजुला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासुन ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत  येईन पुण्यात . तेव्हा वेळेवर न्यायला ये  मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमधे कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरु झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपुन पण जातो.  मग तिकीटं काढणं, मॅडम सुट्टे द्या असं कंडक्टरनी सांगितल्यावर सुट्टे पैसे पर्समधुन शोधणं ही सगळी कामं नेहमी तिलाच करावी लागायची.  मधे कुठल्या स्थानकावर गाडी थांबली की मग ह्याला जाग यायची.  "तु खाली जाणार असशील तर प्लीज माझ्यासाठी लेज घेऊन ये ना." त्याला पक्कं माहीती असतं की मी खाली जाणारच आहे.  जरा कुठे जबाबदारीची जाणीव नाही ह्या माणसाला.  बर ह्याने कुंभकर्णासारख्या झोपा काढल्यावर मी काय करायचं? बसमधे काही वाचता येत नाही. वॉकमन बरोबर घ्यायचा मी प्रत्येक वेळी विसरते. खिडकीपाशी बसाव म्हटल तर ते ह्याला चालत नाही. कारण काय तर साहेबांना वार्‍याशिवाय झोप येत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नुसती चिडचिड होत होती तिची.  त्यात आता ट्रॅव्हल कंपनीवाले तिच्या मागे लागले. "मॅडम कुठे जायचय? दादर, अंधेरी, बोरीवली? बसपेक्षा कमी रेट मधे... व्हिडीओ कोच आहे मॅडम". "नकोये..... अरे मी आत्ताच मुंबईहुन आलीये. परत कशाला जाऊ तिकडे?" ती तिरसटुन बोलली. ते ऐकल्यावर पटकन एक-दोन रिक्षावाले आले. "मॅडम कुठे जायचय? या ना इकडे."  तिला आता बोलायची पण इच्छा होत नव्हती. मग तिने हातानीच नको अशी खुण केली.  एक नवरा सोडुन बाकी दुनियेला माझी काळजी आहे. एक क्षण तिला वाटुन गेलं की रिक्षा करून जाव पटकन.  पण तिला आठवल, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणुन मीटरपेक्षा जास्त भाड घेतल होतं. ते  जवळपास मुंबईच्या भाडयाएवढच पडल होतं.  त्यामुळे तिनी तो विचार एकदम झटकुन टाकला. मग सुटकेस उभी करुन त्याल ती जरा टेकली. पर्समधुन  मोबाईल काढला आणि परत अमरला फोन लावला.  पुर्ण वेळ रिंग वाजली पण फोन काही उचलला नाही. तिला आठवल, लग्नाआधी एकदा सकाळीच दोघांना सिंहगडला जायचं होतं.  त्यावेळी एकदम ऑन-टाईम आला होता पठ्ठया.  माझा पोलो नेकचा टीशर्ट सापडत नव्हता म्हणुन मला फक्त पंधरा मिनिटं उशीर झाला तर सारखं घडयाळ दाखवत होता मला. "तुझं मॅचिंगच सगळं सापडलं नसेल म्हणुनच उशीर झाला तुला. लोक सिंहगड पहायला येणारेत, तुला नाही." त्याला टीशर्टचं कारण काही शेवटपर्यंत पटलचं नाही. लग्नाआधी अगदी काळजीवाहु सरकार होता. (हा त्याचाच आवडता शब्द). &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिला आठवलं, पावसाळ्यात एकदा गाडी घसरल्यामुळे तिच्या पायाला हेअर-क्रॅक गेला होता. तेव्हा हे महाशय जवळजवळ वीस दिवस रोज तिला घरुन ऑफिसमधे आणि ऑफिसमधुन घरी पोहोचवायचे.  त्याला ती म्हणाली सुद्धा "अरे मी जाईन रिक्षाने, कशाला एवढा त्रास घेतोस!!!" त्यावर "मी तुझा जिन आहे.  तु फक्त काम सांगायचं, मग मी - जो हुकुम मेरे आका - म्हणुन तुझी सगळं काम ऐकणार." असं त्याच उत्तर.  तिला आवडतो म्हणुन त्या दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर त्याने तिच्यासोबत  (एरंडेल पिल्यासारखा चेहरा करून का होईना) पाहिले.   &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आता? एक काम वेळेवर करेल तर शपथ.  दहा वेळा ह्याच्या मागे लागल्यावर कुठे काम मार्गी लागतं.  शक्य तितकी काम माझ्यावर ढकलणं हेच एक मोठ्ठ काम करतो हा बाबा.  लग्न करुन हक्काची कामवालीच आणलिये जशी काही ह्यान. स्वत: कसही वागल तरी चालेल पण मी मात्र कायम  आदर्श पत्नी सारखचं वागल पाहिजे.  आता ह्यानी फोन केला आणि  चुकुन जरी मला नाही घेता आला तर हा आकाशपाताळ एक करणार.  शी वैताग आहे नुसता. विचार करुन करुन तिचं डोक दुखायला लागल होतं आता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हाय लेझीम!", गाडीचा हॉर्न आणि हाक दोन्ही एकदमच ऐकु आले. मी त्राग्यानी समोर पाहिलं तर अमरच होता. कधीही झेलम अशी सरळ हाक मारणार नाही.  आई-बाबांनी इतक सुंदर आणि वेगळ नाव ठेवलं माझं.  बारशाच्या वेळी आत्तुला आधीच सांगुन ठेवल होतं त्यांनी की झेलमच नाव ठेवायच माझं म्हणुन.  कॉलेजमधे असताना काळे मॅडम नेहेमी म्हणायच्या खुप छान नाव आहे ग तुझं. लग्नानंतर अजिबात बदलु नकोस.  तस मी अमरला आधीच सांगुन ठेवल होतं की नाव बदलु नकोस म्हणुन.  त्याला मात्र  तांदळात नाव लिहायची फार इच्छा होती.  त्यामुळे त्याच सारखं चालायच की मी नाव बदलणार म्हणुन. मी म्हणायचे की अडनाव बदलणार आहे ना मी... आणि ते तांदळात लिहायची एवढी हौस असेल तर माझं आत्ताचच नाव लिही.  त्यावर म्हणायचा त्यात काय थ्रिल आहे मग?  तेव्हा नाव बदलु दिलं नाही म्हणुनच सारखा लेझीम म्हणतो. हां...फक्त चिडतो तेव्हा झेलम अशी सरळ हाक मारतो.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्ता त्यानी लेझीम हाक मारल्यामुळे तिनी मुद्दामच दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग त्याला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं असावं. गाडी पटकन स्टॅंडवर लाऊन तिच्याकडे गेला.  "अग सॉरी, काय झालं की..." "राहु दे तुझी कारणं तुझ्यापाशीच. मी जाते रिक्षानी." त्याचं वाक्य मधेच तोडत ती म्हणाली.  त्यावर काहीच न बोलता त्यानी पटकन सामान उचललं, गाडीवर नेउन ठेवलं आणि तिच्या बाजुला शांतपणे उभा राहिला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही.  मग तिनी हळुच त्याच्याकडे निरखुन पाहिलं.  दमल्यासारखा दिसत होता. अरे ह्याचे हात पण काळे झालेत की..ती मनाशी  म्हणाली. "का उशीर झाला?" अस तिनी विचारल्यावर त्यानी पण हळुच (आणि सावधपणे) पाहिलं तिच्याकडे. "मी घरातुन पाचलाच बाहेर पडलो होतो.  पण त्या रतन भेळेपाशी गाडी पंक्चर झाली. आता एवढया  सकाळी कुठलं दुकान उघडं मिळणार?  मग थेट बोराच्या पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेली. तिथल्या त्या केरळी अण्णाला उठवल झोपेतुन.  म्हटल अर्जंट पंक्चर काढुन दे.  तुला फोन करावा म्हणुन मोबाईल काढायला खिशात हात घातला तेव्हा लक्षात आलं की गडबडीत मोबाईल घरीच विसरलो.  मग अस वाटल की कदाचित तुझी गाडी अर्धा पाऊण तास लेट होईल. कारण मागच्यावेळी एकदा लोणावळ्यालाच खुप वेळ थांबल्यामुळे गाडीला  पुण्यात यायला लेट झाला होता ना.  खर तर मी तुला एखाद्या  एसटीडी बुथपाशी थांबुन फोन करायला पाहिजे होता. पण.." ती त्याच्याकडे बघुन प्रसन्नपणे हसली आणि पाठीवर थोपटत म्हणाली "इट्स ओके.  चल मला चहाची खुप तल्लफ आलिये.  मला 'तुलसी'तला  चहा प्यायचाय." त्यावर एकदम खुष होत तिच्या काळजीवाहु सरकारने "जो हुकुम मेरे आका" अस म्हणत गाडीला किक मारली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-1416457273875957842?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/1416457273875957842/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=1416457273875957842' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/1416457273875957842'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/1416457273875957842'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2008/06/blog-post_18.html' title='एक छोटीशी सकाळ'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-5589881487542423125</id><published>2008-06-10T20:21:00.001+05:30</published><updated>2008-06-13T18:20:10.662+05:30</updated><title type='text'>बॉलिवूड मधले हिरो</title><content type='html'>चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा.. हा चित्रपट पाहुन तर त्याच्याविषयीचा आदर एकदमच दुणावला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिलीप कुमारचा सौदागर हा एक चित्रपट पाहिल्याचं आठवतं. ती वेळ खरं तर त्याची वानप्रस्थाश्रमाकडे जायचीच होती. पण नंतर त्याचा मुकुल देव (हे नाव पण आठवत नसेल तुम्हाला)आणि ममता कुलकर्णी (हि वाटयाला आलेल्या कमीत कमी भुमिकेत जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून मिळालेल्या संधीचं सोनं करायची) सोबत किला (म्हणजे मराठीतला किल्ला) नामक प्रचंड टुकार चित्रपट आला . आपल्या सुदैवाने नंतर त्याने लवकरच चित्रपट संन्यास घेतला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;धर्मेंद्र हा एक बर्‍याच काळापासून दर्शन देत आलेला आहे.  तो आधी खरोखरच देखणा दिसायचा. पण आता तो एकदमच खप्पड दिसतो. धर्मेंद्र आणि "कुत्ते कमीने" संवादाचं एकदम पक्कं समीकरण बनल आहे.  मला वाटतं गांधीजी मरताना जसे "हे राम" म्हणाले होते तसे धर्मेंद्र मरतानाही "कुत्ते कमीने" म्हणूनच शेवटचा श्वास घेईल.  त्याचा एक चित्रपट आठवतो ज्यात त्याने दोरखंडाच्या सहाय्याने एक विमान रोखून धरल होतं.  अशा अनेक अतर्क्य गोष्टी त्याने चित्रपटात केल्या आहेत.  &lt;br /&gt;&lt;br /&gt;जितेंद्र हा त्याच्या पांढर्‍या बुटांमुळे लक्षात राहिला. त्याच्या विशिष्ट प्रकारच्या नाचण्यामुळे त्याला "जंपिंग जॅक" म्हणायचे.  त्याने मात्र प्रेक्षकांना फार काळ त्रास दिला नाही. त्याचा उधार की जिंदगी हा शेवटचा चित्रपट होता (ज्यामधे काजोलने पदार्पण केल होतं). बहुदा नंतर त्याला कोणी कामच दिल नसावं.  नंतर त्याने त्याच्या मुलाला तुषार कपूरला आणुन चांगलाच सूड उगवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्यंतरी मिथुन चक्रवर्तीचे प्रत्येक वर्षी नियमितपणे बी-ग्रेड चित्रपट यायचे.  अगदी इथुन तिथुन मिथुनच दिसायचा. त्याला म्रुगया आणि अग्निपथ ह्या  चित्रपटांसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं ह्यावर विश्वासच बसत नाही.  त्याचे काही संवाद एकदम भन्नाट असायचे.  उदाहरणार्थ: "तेरे नाम का कुत्ता पालू", "तेरी जात का बैदा मारू","तेरी आपडी की टोपडी","दिखने मे बेवडा... भागने मे घोडा... और मारने मे हथोडा"&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाना पाटेकरचे तिरंगा, क्रांतीवीर हे चित्रपट मात्र एकदम आवडून गेले। "ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून" वाल लॉजिक एकदम पटुन गेलं. त्याचा तो आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा आणि त्याला मिळालेली बेफिकीर व्रुत्तीची जोड ह्या सगळ्यानी मनाचा ताबाच घेतला. नंतर त्यानी स्वत: दिग्दर्शित केलेला प्रहार हा देखील त्याच्या वेगळेपणामुळे लक्षात राहिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल.  त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं.  त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे.  ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर नंतर सनी देओलचा फनी देओल होत गेला. गदर मधे तर तो अक्षरश: जमिनीतून बोअरिंग उचकटून  १०-५ लोकांना त्याने मारताना दाखवला आहे. त्याच्या हाणामारी आणि संवादांमधे तोचतोचपणा येऊ लागला. ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-5589881487542423125?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/5589881487542423125/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=5589881487542423125' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/5589881487542423125'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/5589881487542423125'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2008/06/blog-post_10.html' title='बॉलिवूड मधले हिरो'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1526807386042257420.post-8938872302630410986</id><published>2008-06-10T00:21:00.000+05:30</published><updated>2008-06-10T00:56:30.075+05:30</updated><title type='text'>मन उधाण वार्‍याचे......</title><content type='html'>हे गाण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा अस वाटत की मन खरोखर आपल्याच मस्तीमधे धुंद होऊन, बेभानपणे झुलतय...&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतक्या ठिकाणी ह्या मनाबद्दल ऐकतो/वाचतो की कधी कधी अस वाटत की हे मन आपल्या शरीराचा एक भागच आहे. पण विचार केल्यावर लक्षात येत की ह्रदय म्हणजे काही मन नाही. ह्रदयाला स्पंदन असतात. एका मिनीटामध्ये अमुक अमुक ठोके पडले की समजायच सगळ आलबेल आहे. हे ह्रदय तर मला घडयाळाच्या लंबकासारख वाटत. विशिष्ट गतीन सतत ठोके देत असत. ह्रदयाला मनासारख उधाण होऊन चालत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला वाटतं, सर्वप्रथम मनाची ओळख समर्थ रामदास स्वामींनी करून दिली. लहानपणी "मनाचे श्लोक" वाचताना मन म्हणजे नक्की काय हे खचितच कळल नव्हतं. पण जवळ जवळ प्रत्येक श्लोकामध्ये मन हेच कर्ता होतं आणि बहुतेक वेळा "मना" ला "सज्जना" हाच शब्द जोडुन यायचा. त्यामुळे मन ही काहीतरी सरळमार्गी गोष्ट असून तिच्यावर खुप मोठया जबाबदार्‍या आहेत अस माझं मत बनल होत. तेव्हा तरी उधाण मनाशी ओळख झाली नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर शाळेमध्ये बहीणाबाईंची "मन वढाय वढाय" अशी एक कविता होती. त्या कवितेतून मनाच्या स्वछंदीपणाची पहिली ओळख झाली. मन "मोकाट","लहरी" आणि "पाखरू" सुद्धा असू शकतं हे त्या कवितेतून कळल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अस हे मन नंतर वेळोवेळी भेटत राहिलं. "मनासारखं न होणे","मनसुबे रचणे","मनात मांडे खाणे","मनाला येईल तसे वागणे/बोलणे", "मनमुराद हसणे","मनकवडा" अशा अनेक वाक्प्रचारातुन मनाचे संदर्भ येत राहिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनाला सैरभैर,बेफाम,अवखळ अशी विशेषणं जास्त शोभून दिसतात. वेळप्रसंगी त्याला शांत, संयमी, खंबीर अश्या प्रौढ भुमिका पार पाडाव्या लागतात. पण हे त्याच्यावर ओढुन-ताणुन घातलेलं आवरण असतं. गंभीर भुमिकेत असतानाही ते उसळू पहातं, मर्यादा तोडू पहातं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा गाडी प्रेमावर येते तेव्हा मात्र बहुतेक वेळा ह्रदयच बाजी मारून जातं. प्रेमात ह्रदयांचीच देवाणघेवाण होताना दिसते; मग अशा वेळी मन कुठे असते? बहुदा ह्रदयाला स्पंदनाबरोबर वेळ पडली तर दुसर्‍या ह्रदयात स्थलांतर करण्याची सुद्धा कामगिरी नेमून दिलेली असावी. तरीदेखील, ह्रदय मोजुन मापुन बेफ़ाम होतं. सामान्य अवस्थेत असताना जेवढे ठोके पडत असतील त्यापेक्षा थोडेसे जास्त प्रेमावस्थेत पडत असतील. त्यामुळे मर्यादा सोडून काही ह्रदयाला वागता येत नाही. ह्याउलट, मनाला मर्यादेशी काही घेणंदेण नसत. खर पाहता, समोरची व्यक्ती मनात भरल्यानंतरच ह्रदयाची देवाणघेवाण शक्य आहे. त्यामुळे जोवर मन पसंतीचा "ग्रीन सिग्नल" देत नाही तोवर ह्रदय बापुड्याला काहीच करता येत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी हा जो मी लेख लिहिला ते देखिल माझ्या मनात आलं म्हणुनच. हा लेख वाचून तुम्हाला मनस्ताप झाला नसेल अशी आशा करतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1526807386042257420-8938872302630410986?l=sucheltas.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sucheltas.blogspot.com/feeds/8938872302630410986/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=1526807386042257420&amp;postID=8938872302630410986' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/8938872302630410986'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1526807386042257420/posts/default/8938872302630410986'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sucheltas.blogspot.com/2008/06/blog-post.html' title='मन उधाण वार्‍याचे......'/><author><name>Hrushikesh Thite</name><uri>http://www.blogger.com/profile/00898208420087355737</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry></feed>
